घर म्हटलं की भांड्याला भांडे लागणार हे खरच आहे. वादविवाद हे होतच असतात ,याला मूळ कारण असतं ते म्हणजे हाताची पाचही बोटं सारखी नसणं. पण जेव्हा एखादा छोटासा वाद विकोपाला जातो ,तेव्हा मात्र मनस्ताप सहन करावा लागतो .बऱ्याच वेळा घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते . घरात येणारी व्यक्ती ही नकारात्मकता ( NAGATIVE ENERGY ) घेऊन येऊ शकते किंवा कुटुंबातील व्यक्ती बाहेर गेल्यानंतर ती त्यांच्या मागे सोबत येत असते . तर मग शनिवारच्या दिवशी हमखास या काही गोष्टी करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल.
- शनिवारच्या दिवशी बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीला उंबऱ्याशी थांबून पायावर पाणी घाला ,त्यानंतर डोळ्याला पाणी लावून अर्धा पोळीचा तुकडा उतरवून टाका . या व्यक्तीने घरामध्ये प्रवेश केल्यानंतर उरलेल्या पाण्याने उंबऱ्या भोवती ते पाणी शिंपडून टाका.
- घरामध्ये जर इतर कोणी नसेल तर घरात आल्यानंतर हातपाय धुवून घ्या.
- शनिवारच्या दिवशी हाताच्या मुठीमध्ये काळे धागे घट्ट धरा . त्यानंतर घरातील देवघरासमोर बसून अकरा वेळा रामरक्षा म्हणावी. हे धागे घरातील प्रत्येकाच्या हातात आणि पायात बांधावेत.
- शनिवारच्या दिवशी सायंकाळी घरामध्ये रामरक्षा ,मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे . त्यामुळे घरातील नकारात्मकता नक्की कमी होईल.
- रोज केल्यास उत्तम परंतु , शनिवारच्या दिवशी रामरक्षा लावल्यानंतर घरामध्ये कोळशावर उद आणि कापूर टाकून हा धूर घरभर पसरवा घराच्या कानाकोपऱ्यात हा धूर काही क्षणासाठी तरी कोंडला गेला पाहिजे
- या उपायोजनांमधून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नसून या काही उपायांनी मनावर येणारे दडपण कमी होते . अर्थात हे काळे धागे थेट कोणता परिणाम करत नसतील तरीही आपल्या सोबत कोणतीतरी शक्ती आहे , जी आपले रक्षण करेल अशी मनाला एक सोबत मिळते . त्यामुळे कोणतेही उपाय करताना मनामध्ये केवळ माझ्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी , त्यांचे आत्मबल वाढवणे आवश्यक आहे यासाठी हे उपाय करावेत .