पुणे : विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाला (Teacher Suicide News) काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. मात्र काही ठिकाणी आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करताना दिसत आहेत. आपलं सर्वकाही झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक (Teacher Suicide News) फार कमी पाहायला मिळत असतात. अशीच एक धक्कादायक घटना दौंड तालुक्यामध्ये घडली आहे. यामध्ये विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने एका शिक्षकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
त्या शिक्षकाची 2 महिन्यांपूर्वीच झालेली बदली
ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यामधील जावजीबुवाचीवाडी येथे घडली आहे. जावजीबुवाचीवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अरविंद देवकरांनी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जाणं इतकं मानावर घेतलं त्यांनी थेट स्वतःच आयुष्यचं संपवलं. सर्वच्या सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने अरविंद यांनी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे अगदी 2 महिन्यांपूर्वीच अरविंद यांची या शाळेत बदली झाली होती.
काय घडले नेमके?
गावातील छोट्याश्या शाळेची दुरावस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अऱविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना आवडला नाही. यानंतर पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व 10 विद्यार्था शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झाले. आणि त्यांनी याच तणावातून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
अरविंद यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठीदेखील लिहिली आहे. पूर्वीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला चांगले सहकारी लाभले होते असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. आत्महत्येपूर्वी अरविंद यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला आहे. आपली नियुक्ती मे महिन्यामध्ये झाली होती. त्यानंतर नेमकं काय काय घडलं आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपण काम करुन घेतल्याने पालक नाराज झाले यासंदर्भातील तपशीलही अरविंद यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. अरविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनादेखील मोठा धक्का बसला आहे.