पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरा कायम असून,घाट माथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्याने, चारही धरणात पाणीसाठा वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खडकवासला धरण अद्यापही ९५ टक्के भरलेले असल्याने धरणातून बुधवार सकाळी ६ पासून १०,२४६ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला ३८ मिमी
पानशेत ९३ मिमी,
वरसगाव ८८ मिमी
टेमघर १६० मिमी
पावसाची नोंद झाली आहे .चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १२.२३ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी पेक्षा हा पाणीसाठा ८.७९ टीएमसी होता.