पुणे : प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिस दल (Pune News) खडबडून जागे झाले आहे. सध्या कार्यरत (Pune News) 15 दामिनी पथकांमध्ये 25 पथकांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दामिनी पथकांची संख्या 40 झाली आहे.सदाशिव पेठेतल्या घटनेमुळे सध्या भीतीचं वातावरण आहे.
Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव
महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त शाळा, महाविद्यालयं, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात वाढवण्यात येणार आहे. तसच सकाळ आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात शंभर बीट मार्शल तैनात करण्यात येणार आहे. तरुणांनी हल्लेखोराला पकडून पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर पोलिस तिथे उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे दोन कर्मचाऱ्यांना तिथे ड्युटी देण्यात आली असतानादेखील ते चौकीत नव्हते.
Uniform Civil Code : समान नागरी कायद्याच्या मुद्यावर “आप”चे भाजपाला समर्थन ?
तसच घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांचे पेट्रोलिंग, बीट मार्शल तसेच दामिनी पथकांवर टीका झाली. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान प्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसच शाळा, महाविद्यालयं येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसवण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होणार आहे.