पुणे : पुणेकरांसाठी (Pune Water) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कालवा समितीची बैठक घेतली. त्यात पाणी कपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला.
काय घेतला निर्णय?
या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला असून पाणीकपात न करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. त्यामुळे भर उन्हात पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट तुर्तास तरी टळलं आहे. गेल्या काही महिन्यापासून पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं होतं.
गेल्या 25 वर्षांतील सर्वात कमी पाऊस यंदा पुणे जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात कमी पावसामुळे पाणी साठा कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी संकट आणि शेती पाण्याशिवाय कशी होणार अशी चिंता पडली होती. पण कालवा समितीची बैठकीतील निर्णयामुळे पुणे शहरात पाणी कपातीचे संकट टळलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू
Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण
Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना