पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी कालवा समितीची बैठक घेऊन पुणेकरांवरील (Pune News) पाणी संकट दूर केलं होतं. खडकवासला धरणात शहराला पुढील किमान 5 महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीच टांगती तलवार लटकली होती. पण या बैठकीतून अजित पवार यांनी पाणीकपातीची गरज नसल्याचं सांगून पुणेकरांना दिलासा दिला होता मात्र आता पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाणीकपाती संदर्भात बातमी समोर आली आहे.
भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्तीमधील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करावं लागणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
‘या’ भागांमध्ये राहणार पाणी पुरवठा बंद
आदर्शनगर
कल्याणीनगर
हरीनगर
रामवाडी
शास्त्रीनगर
संपूर्ण गणेशनगर म्हस्के वस्ती परिसर
कळस
माळवाडी
जाधव वस्ती
विशाल परिसर
विश्रांतवाडी स. नं. 112 अ
कस्तुरबा
टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक
जयजवान नगर
जय प्रकाशनगर
संजय पार्क
एयर पोर्ट
यमुना नगर
दिनकर पठारे वस्ती
पराशर सोसायटी
श्री. पार्क
ठुबे पठारे नगर
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार
Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त
Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ