इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी भाजपच्या मित्र पक्षांकडून देण्यात आली असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असण्याचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर… pic.twitter.com/GkPWDRPo42
— Harshvardhan Patil (Modi Ka Parivar) (@Harshvardhanji) March 4, 2024
काय लिहिलं पत्रामध्ये?
या पत्रात हर्षवर्धन पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात आपल्या युतीचे सरकार योग्य प्रकारे काम करत आहे. परंतु, इंदापूर मध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी मेळावे आणि विविध भाषणांमधून माझ्यावर शिवराळ भाषेत वक्तव्य करत असून त्यांनी मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली आहे. ही बाब गंभीर असून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंतीदेखील हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना या पत्राद्वारे केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी
Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर
Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी
Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू
Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू