पुणे : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ (Ajit Pawar) उडाली होती. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. हे दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली आहे. यादरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी पक्ष सोडून आणि पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपाबरोबर चूल मांडली असा आरोप करण्यात आल्याने अजित पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांची गुरुवारी जुन्नरमध्ये सभा पार पडली. यावेळी शरद पवार गटाने केलेल्या टीकेला अजित पवारांनी भर सभेत प्रत्युत्तर दिलं. “शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपाबरोबर सत्तेत बसलेलं का चालत नाही? उद्धव ठाकरे यांचं सरकार आता जातंय हे समजलं होतं त्याचवेळी पक्षातील सगळ्यांनी ठरवलं होतं की, आपण आता भाजपाबरोबर सरकारमध्ये जायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील झालेलं चालतं, मग महायुतीत भाजपबरोबर गेलं तर का चालत नाही? राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. परंतु, वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तो बरोबर आणि आम्ही घेतला तर तो चूक. असं कसं चालेल?,” असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली
Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या
CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर
Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद