पुणे- अजित पवार कधी कुणाला चिंता काढतील ? कधी कुणाला टोमणे मारतील किंवा कधी कुणाला झोपतील हे कुणाला सांगता येत नाही. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तळजाई वनउद्यान प्रवेशद्वाराच्या उदघाटनाला आले असताना त्यांनी पुणेकरांना कडक शब्दात झापले.
आज, शनिवारी सकाळी- सकाळी अजित पवार यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन अधिकाऱ्यांची पळापळ केली. अजितदादांनी यावेळी तळजाई टेकडीला चांगली रपेटही मारली. यावेळी बोलताना त्यांनी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या पुणेकरांवर टीका केली. अजित पवार म्हणाले, “पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्री आणू नयेत. कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवं तर गादीवर झोपवा… पण इथं तळजाईवर नको” अजित पवार पुढे म्हणाले, “मी तळजाईकडे येताना बघितलं लोक रस्त्यावरच कचरा टाकतात हे बरं नाही. भटकी कुत्री तळजाईवर येतात, काही लोक पाळीव कुत्री पण फिरायला घेऊन येतात, हे थांबलं पाहिजे. तळजाईवरची ससे आणि मोर कुत्री खातात, या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तळजाईवर वनोद्यानाचं सौंदर्य टिकलं पाहिजे, इथली झाडं जगवण्यासाठी टेकडीवर पाइपलाईन टाकावी लागेल, त्यासाठी मी निधी देतो. इथलं फुलपाखरू उद्यान बहरलं पाहिजे. तळजाईमुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळतोय, म्हणजे हे वनउद्यान टिकलं पाहिजे”
अधिकाऱ्यांना देखील खडसावले
अधिकाऱ्यांना पुणे पोस्टिंग पाहिजे असेल तर सकाळी उठायलाच पाहिजे, कारण मी सकाळीच कामाला सुरूवात करतो, हे अधिकाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवावं. अजित पवारांमुळे अधिकाऱ्यांना पण सकाळी उठावं लागतं… पुन्हा अशी कुरबूर नको. मी आज ठरवून तळजाईवर आलो, मला इथली कामं बघायची होती, लोकांनाही भेटलो समस्या जाणून घेतल्या असंही अजित पवार म्हणाले.