मुंबई : मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या (Election Commission) भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काय घडले होते तेव्हा?
मुंबईचे मतदान गाजले ते त्याच्या भोंगळ कारभारामुळे… सामान्य जनता, विरोधी पक्ष, कलाकार सगळ्यांनीच टीका केला होती. मुंबईतील मतदारसंघातून संथ गतीने मतदान झाल्याच्या तसेच रांगेत अनेक तास ताटकळत अभे राहूनही अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर केले. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.
काय आहे नियम?
शेवटच्या 48 तासात ज्यावेळी कोड ऑफ कंडक्ट लागतो म्हणजे ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्या काळात कोणीही प्रचार करायचा नसतो. प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. मात्र थेट कोणत्या पक्षावर, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kolhapur News : कोल्हापूरात अपघाताचा थरार ! कारच्या धडकेत 6 जण जखमी
Pune News : विभागीय आयुक्तांनी मतमोजणी केंद्रांना दिली भेट
Kedar Jadhav Retirement : केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय
Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध
Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग
Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स
Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव
Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू