मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या नेंत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभेत बोलताना जितेंद्र आव्हडांने केला एक मोठा गौप्यस्पोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभेत बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या नेंत्यावर टीका करताना एक मोठा गौप्यस्फोट केला.‘सुनील तटकरे मंत्री असताना पेणमधील बाळगंगा धरणाचा खर्च 368 कोटींवरून बाराशे कोटींवर पोहोचला, त्यामुळे ते अडचणीत आले होते. सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे अटकेच्या भीतीनं रोज सकाळी शरद पवारांना फोन करून भाजपसोबत जाण्यासाठी गळ घालत होते,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू
Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला