पुणे : राज्यात सध्या निवडणुकीवरून (Supriya Sule) राजकारण तापले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होताना होत आहेत. यादरम्यान आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया ताई गेले 15 वर्ष अजितदादांमुळेच निवडून आले आहेत अशी खोचक टीका केली आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
“अजितदादांनी जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे. असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच आगामी निवडणूकीत महायुतीचा विजय होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळेंवर टीका
यावेळी बोलताना रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला. “दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. विकासाचे राजकारण हवं आहे. सुप्रिया ताई गेले 15 वर्ष अजितदादांमुळेच निवडून आल्या आहेत. दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय…” अशी टीका त्यांनी केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट
Nitin Kareer : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव
Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल
Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी
Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…
Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला
Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप