नवी दिल्ली : मतदान यंत्रातील मतांची आणि व्हीव्हीपॅट पत्रिकांच्या १०० टक्के पडताळणीच्या संदर्भातीळ सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. आता यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नसून मतदान यंत्रावरच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमधील (EVM) मतांची आणि व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) पत्रिकांची १०० टक्के पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्यामुले आता बॅलेट पेपरवर मतदान नाही होणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुनावणी सुरू होती. EVM आणि VVPAT च्या १०० टक्के मोजणीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निकाल जाहीर केला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठात निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना कोर्ट हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कोर्टाने पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे ही मागणी फेटाळण्यात आली आहे. देशातील निवडणुका या इव्हीएम मशिनवरच होणार आहेत. EVM आणि VVPAT या दोन्हींची १०० टक्के पडताळणी शक्य नसून ज्या प्रकारे अंदाजाने EVM आणि VVPAT ची मोजणी होते, तशीच मतमोजणी होणार आहे. सिंबल युनिट हे ४५ दिवसांसाठी सीलबंद ठेवण्यात येणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
Devendra Fadanvis : महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नाही : देवेंद्र फडणवीस यांची टीका
Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल
Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट
Dhule Accident : कारची धडक बसल्याने भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत