मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन रविवारी (दि.11) मुंबईत प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात झाला. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांबरोबर घडलेला किस्सा सांगत त्याची कारणं सांगितली. यावेळी त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला गेलेले असतानाचा घडलेला एक प्रसंग सांगितला.
यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यावरुन तसेच या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिली. प्रशासनाच्या साधन सुविधेवरुनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलं.