मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे समर्थकांनी दत्ता दळवी यांची गाडीदेखील फोडली. या सगळ्या घडामोडीवरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. यादरम्यान आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राज्यात नामर्दांचं सरकार आहे. पळून का जाता, थांबा ना तिथं अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. प्रकाश सुर्वेंच्या मुलानं किडनॅप केलं, त्याच्यावर काय कारवाई झाली? असा प्रश्न विचारताना राऊतांनी म्हटलं की, या राज्यात दोन कायदे आहेत. गद्दारांसाठी वेगळा कायदा असं असेल तर जाहीर करा. राज्यपालांना आम्ही विचारतो. दोन चार षंढ आले आणि त्यांनी काचा फोडल्या गाडीच्या. ही त्यांची मर्दानी. भाड्यानं माणसं घेतात. ठिके, दळवी येतील बाहेर. जर खरा मर्द असेल तर गाडी फोडून तिथंच थांबा असं आव्हानदेखील संजय राऊत यांनी गाडी फोडणाऱ्यांना दिले आहे.
तसेच दत्ता दळवी यांना ज्या शब्दामुळे अटक झाली तो शब्द चित्रपटात आहे. दिघे साहेबांच्या तोंडी तो शब्द सेन्साॅरनं कापला का? तुम्ही त्यांचा अपमान करता? पोलिसांवर दबाव असल्यानं जामीन प्रक्रियेत उशीर होतोय. हरकत नाही, शिवसैनिक तुरुंगात जाऊन मोडत नाही असेदेखील संजय राऊत म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल
Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी
Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?
Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा
Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?