मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे. किर्तीकर यांच्यासह इतर नेत्यांनीही भाजपची तक्रार केली. या तक्रारीमुळे यामुळे भाजप आणि शिवसेनेते मतभेत निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या होत्या. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीनंतर आता भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या विधानावरून गजानन कीर्तिकर यांनी यू टर्न घेतला आहे.
काय म्हणाले गजानन कीर्तिकर ?
भाजपकडून (BJP) सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं आहे. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात बीजेपी-शिवसेना युती नव्हती महाविकास आघाडी होती. शिंदे साहेबांनी उठाव करून ती युती प्रस्तावित केली असं शिवसेनेचे नेते, खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, ‘पुन्हा शिवसेना-बीजेपीच सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले.
आम्ही एनडीएचे घटकपक्ष म्हणून खासदार वावरत होतो. आम्हला एनडीए घटक पक्षाचा दर्जा नव्हता. आता आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. तो जो फरक आहे. त्याठिकणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळला की नाही? की आम्ही आहे तिथेच समजतात की काय? हा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता, असे गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत.