मुंबई : लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections0 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे विरोधकांनी एकजूट व्हयला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांच्या पटना येथील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत.
परंतु या निवणुकीसाठी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याबाबत कायम प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासमोर (Narendra Modi) कोण चेहरा असणार यावरुन भाजपदेखील विरोधकांना डिवचत आहेत. मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून थेट विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल त्याचे नाव सांगितले आहे.
आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा संविधान आणि भारतमाता हाच आहे. लोकांमधून नेता निर्माण होईल. रावणराज्याचा अंत होण्यासाठी वानरसेनाही बरोबर घ्यावी लागेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. यासह अग्रलेखामध्ये आगामी निवडणुकांच्यादृष्टीने अनेक दावे करण्यात आले आहे. पुढील काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह चारेक राज्यांत निवडणुका होतील. यातील मध्य प्रदेश भाजपकडे राहणार नाही असेदेखील ते म्हणाले आहेत.