मुंबई : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीत तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच चुकीची असल्याचं म्हटलं आहे. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात असून त्यांनी माझ्याकडून शिकायला हवं असं म्हटलंय. तसंच महायुतीत माझा अपमान झाला तरी मी मोदीजींच्या विचारासोबत असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच त्यांनी आपण मागितलेल्या जागा न मिळाल्याने नाराजीदेखील व्यक्त केली आहे.
नेमके काय म्हणाले रामदास आठवले?
महायुतीत माझा अपमान झाला. तरीही मी महायुतीसोबत आहे. मी पंतप्रधान मोदींच्या विचारासोबत आहे. मी शिर्डीची जागा मागितली होती पण मला मिळाली नाही. मला जागा देण्यास राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केला. जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी नेहमी त्यांना पाठिंबा दिला होता. आता मी त्यांच्या मुलासाठी प्रचार करणार नाही असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.
शिर्डीच्या जागेशिवाय आठवले यांनी आणखी दोन जागांचे तिकिट मागितले होते. यामध्ये सोलापूर आणि इशान्य मुंबईच्या जागेचा समावेश होता. त्या जागासुद्धा मला दिल्या नाहीत. त्यामुळे आता आम्हाला कॅबिनेट मिनिस्ट्री मिळायला हवी अशी मागणी आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग
Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक