rohit pawar and narendra modi

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

2671 0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान नरेंद्र मोदींनी या सभेमध्ये केले. या टीकेला पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
मोदींनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केल्यावरुन रोहित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. संत एकनाथ महाराजांच्या ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल! नांदतो केवळ पांडुरंग!’ या ओळीचा उल्लेख करत रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. “मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागले. आता 4 जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदींनी पुण्यातील भाषणामध्ये शरद पवारांवर निशाणा साधला. “महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. 45 वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली,” असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांवर निशाणा साधला. “तेव्हापासून (मागील 45 वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. 1995 महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला,” असंही मोदी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

Pune News

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

Posted by - March 8, 2024 0
पुणे : देशात अशक्यप्राय वाटत असलेलं परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं असून, प्रभू श्रीरामचंद्रांची प्रजा कल्याणाची भूमिका घेऊन…
Loksabha News

लोकसभा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा; ‘या’ अटीवर इंडिया आघाडीने घेतला उमेदवार न देण्याचा निर्णय

Posted by - June 25, 2024 0
नवी दिल्ली:  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन राजधानी नवी दिल्लीत होत असून ह्या अधिवेशनात लोकसभा…
Uddhav Thackeray

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 17 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Posted by - March 27, 2024 0
मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटप (Loksabha Election) रखडले होते. मात्र आता ठाकरे गटाने आपल्या 17 शिलेदारांच्या नावाची घोषणा केली आहे.…

महाविकास आघाडीचा महामोर्चा; उद्धव ठाकरे महामोर्चासाठी रवाना

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ आज मुंबईतील क्रुडास कंपनीपासून भायखळ्यातील टाइम्स ऑफ इंडिया च्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार असून मोर्चाच्या…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील (Maharashtra Politics) यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *