पुणे : शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, गेल्या काही दिवसांत या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे बळी देखील गेले आहेत. आज पुण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे हे गेल्या पाच वर्षात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते जर दरवर्षी पावसाळ्यात दुरुस्त करावे लागत असतील. तर ५ वर्षात भाजपने केलेल्या रस्त्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील यावेळी केली.
“खड्डे हा केवळ त्या रस्त्यापुरता मर्यादित विषय नसून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे , मणक्याचे आजार होत आहेत. काही अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहेत, तर काहींचा या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. जर सर्वसामान्य पुणेकरांनी भरलेल्या टॅक्समधून कोट्यावधी रुपये खर्चून रस्ते तयार केले जातात.
त्याचे निकृष्ट काम केले जाते तर या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदारी धरत गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपमधील पदाधिकारी, या रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी, या रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार या सर्वांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा”,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.