रायगड : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आलेली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निमित्ताने रायगडमधील एकमेव जागा त्यांना जिंकता आली. यादरम्यान सुनील तटकरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा आहे असे विधान सुनील तटकरे यांनी केले आहे. त्याच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
लोकसभा निवडणुकीतील विजयात महायुतीमधील घटक पक्षांबरोबरच काँग्रेसनेही आपल्याला मदत केल्याचा दावा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेना भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी केलेली मदत या सर्वांच्या बळावर मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मला यावेळी अलिबाग विधानसभा मतदार संघातून मिळाल्याचं तटकरे म्हणाले आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब
Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर
Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट
Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग
Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड