नाशिक : रविवारी महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा पुतळा हटवण्यात आला होता. या घटनेमुळे छगन भुजबळ यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. या घटनेला विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. सावरकरांच्या जयंतीला माझा विरोध नाही, मात्र शिवराय यांची राजमुद्रा तिथे लावण्यात आली होती, ती झाकून सावरकरांचा पुतळा लावण्यात आल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
नेमके काय म्हणाले छगन भुजबळ ?
महाराष्ट्र सदनात छोट्या चौकात दोन पुतळे आहेत. एक अहिल्याबाई होळकर यांचा आणि दुसरा सावित्रीबाई फुले यांचा . त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आले, मात्र पुतळे बाजूला करण्यात आले. दुसरीकडे हॉल असताना कार्यक्रम तिथेच का करण्यात आला? असा सवाल उपस्थित करत ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. ते पुतळे जाणीवपूर्वक हटवण्यात आले का? हे शोधून काढून ज्यांनी हे काम केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
नव्या संसदेच्या उद्घाटनावर दिली ही प्रतिक्रिया
मला त्या घटनेचं अतिशय वाईट वाटलं, तेव्हा स्वातत्र सौनिक होते आणि आज उघडे बंब माणसं आहेत. ही माणसं कुठून आणली? पवारसाहेब म्हटले ते खरं आहे, धर्मकांडात सहभागी झालो नाही याचा आनंद आहे, लोकत्रंत आहे की मनुतंत्र असा सवाल छगन भूजबळ यांनी उपस्थित केला.