नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

142 0

ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार दणका मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवार (ता.१७ मार्च) रोजी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत झालेल्या निर्णयात नवाब मलिक यांच्याकडून राजीनामा घेतला नसला तरी त्यांच्याकडून मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. त्यानंतर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

या दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचे काम दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचे ठरवल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.

Share This News

Related Post

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर यश मिळालं. मराठा आरक्षणासाठीच्या असलेल्या मागण्या…
Maharashtra Weather

Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - May 19, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain Alert) मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा…
Ratan Tata

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - December 16, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या उद्योगपतींना धमक्यांचे कॉल येत आहेत. मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री यांच्यानंतर आता टाटा समूहाचे माजी…

महत्त्वाची बातमी : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - March 4, 2023 0
महाराष्ट्र : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता लवकर भरतीच्या मर्यादेत…

क्रिकेट विश्वावर शोककळा ! शेन वॉर्न याचे निधन

Posted by - March 4, 2022 0
क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर आली असून. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वॉर्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *