बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारनं मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. सरकारनं सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा राज्यभरातील मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 900 एकर जागेवर सभा घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सभेची घोषणा केल्यानंतर सभेसाठी मैदानाच्या पाहाणीला सुरुवात झाली आहे. या सभेची तारीख आणि ठिकाण अद्याप ठरलेलं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी ही विराट सभा होणार असल्याचे संकेत जरांगे पाटील यांनी दिले आहेत. गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही केली, त्यामुळे पुन्हा एकदा शांततेत कोट्यावधी मराठा एकवटणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा
Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल
Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक