मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही. मला लोकचळवळीचा मार्ग माहीत आहे. 6 जुनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर 4 जूनलाच मी आमरण उपोषणाला बसणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यांनी आमचं तर वाटोळं केलंचं आहे, यांना फक्त यांच्या महिला दिसल्या, आमच्या माता भगिणी यांना दिसत नाही. महायुतीने आम्हाला काही दिलं नाही, महाविकास आघाडीवाले देखील शहाणे नाहीत. त्यांनी होतं ते आरक्षण घालावलं, पण आता गोरगरिबाचं कल्याण होणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ
Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?