मुंबई : मुंबईत काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या (Congress) पाच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याकडे या पाचही नगरसेवकांनी राजीनामे सोपवले आहेत.हे सर्व नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
पुष्पा कोळी (सायन), वाजिद कुरेशी (चांदिवली), बब्बू खान (धारावी), गंगा कुणाल माने (धारावी), भास्कर शेट्टी (धारावी), अशी राजीनामा दिलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. यातील चार नगरसेवक हे वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील असल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या सर्व नगरसेवकांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार वाजता ठाण्यात या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत राजीनामा देत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले आहे.