मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही दिवस शिल्लक (Maharashtra Politics) आहेत. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. महाराष्ट्राच्या 48 जागांचे निकाल काय लागतात? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण या निकालांनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी घडताना दिसणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत आहे, असा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत सुनिल तटकरे यांनी हा दावा केला आहे. मागच्या काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, आमदार पक्षांतर्गत नाराजीतून पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याचा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Porsche Accident Case : अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघांवर असणार साऱ्यांचं लक्ष
Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा
T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक
Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज
ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप