मुंबई : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) जागावाटपाचा महाविकासआघाडी आणि महायुतीचा तिढा अजूनही कायम आहे. आतापर्यंत भाजपने 20 तर काँग्रेसने 7 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, यातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनी महाविकासआघाडीला 26 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
‘कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आम्ही पक्ष म्हणून आणि आयडोलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर अशी भूमिका घेत असतो. शाहू महाराजांची विचारसरणी आणि चळवळीच्या जवळचं कुटुंब मानतो. पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने केले जातील. मागे जे घडलं होतं ते या वेळेस न घडू देणं याची दक्षताही त्याठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला
Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय
Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट
Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना
Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ