नवी दिल्ली : वृत्तांस्था – लोकसभा निवडणूक जवळ आल्या असताना आता उद्या दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करणार आहेत.ही पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेच देशात आचारसंहिता लागू होणार आहे. २६ तासानंतर ही आचारसंहिता लागू होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे तसचं प्रचारसभांचे नारळ फुटले, राजकीय नेत्यांचे काही दौरेही झाले पण आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिताही लावली जाते. काय असते ही आचारसंहिता ? ही का आवश्यक असते आणि काय असतात याचे नियम ? आचार संहितेचं उल्लंघन केल्यास काय शकतं शकत? जाणून घेऊयात
आचारसंहिता म्हणजे काय?
आचारसंहिता म्हणजे कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार आणि नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते तसेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये हे आखून दिलेल्या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.
आचार संहितेचं उल्लंघन केल्यास काय होते?
एखाद्या उमेदवाराने याचे उल्लंघन केले तर निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो. उमेदवाराच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाऊ शकतो. उमेदवाराला निवडणूक लढवण्यास रोखल जाऊ शकतं. जर दोषी असल्याच सिद्ध झालं तर तुरुंगवास देखील होऊ शकतो.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत
Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील
Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग
Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?