मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या (Loksabha 2024) पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. जरांगेवर झालेला कथित अन्याय आणि त्यांची विशेष तपास पथकाकडून म्हणजेच एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 250 हून अधिक उमेदवार उतरवण्यात येणार आहेत.
अर्धापूरमधील पिंपळगाव (महादेव) या गावातील ग्रामपंचायतीत संमत झालेल्या ठरावातून ही सारी गोष्ट सुरु झाली. या गावातील 10 तरुणांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला. यामधूनच प्रेरणा घेत आता अर्धापूर तालुक्यातून तब्बल 250 हून अधिक मराठा तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरलं आहे. राज्य सरकारविरुद्धचा असंतोष व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही
Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल
Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा