अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. मात्र वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात काही ठिकाणी तिरंगा किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अशीच लोकसभेची जागा म्हणजे अमरावती लोकसभा. सध्या हा मतदार संघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या ठिकाणी आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनामुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होऊ नये यासाठी आपण काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिल्याचं गवई यांनी म्हटलं आहे. तसेच आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते वंचितच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपसुद्धा गवई यांनी यावेळी केला.
अमरावतीमध्ये होणार चौरंगी लढत
भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रहारनं देखील या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला आहे. तर दुसरीकडे रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग