मुंबई : राज्यातील जागा वाटपाचा (Loksabha) तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी हे हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्यामुळे प्रचंड नाराज आहेत. अशीच एक जागा धाराशिव लोकसभेची आहे. ही जागा शिवसेनेची हक्काची जागा आहे. कारण या जागेवरून ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे या जागेवर आता शिंदे गटाने दावा सांगितलेला आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घेत या जागेवर अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे धाराशिव मधील शिवसेनेचे पदाधिकारी प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी, अशी आग्रही भूमिका घेऊन धाराशिव मधून तब्बल 25000 शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 3000 गाड्यांचा ताफा घेऊन हे शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे निघालेले आहेत. या जागेसाठी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक आहेत. त्यामुळे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात हे शिवसैनिक मुंबईकडे रवाना झालेले आहेत. तर हे शिवसैनिक वर्षा बंगल्यासमोर शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत.
धाराशिव ची जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. त्यामुळे ती शिवसेनेलाच परत मिळाली पाहिजे, ही मागणी शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे करणार आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास पुढील निर्णय घेण्याचा इशारा देखील दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री
Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या
Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता
Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन
Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी
Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग
Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक