नागपूर : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. आमच्यासोबत आहे तो राष्ट्रवादी पक्ष खरा आहे. बाकी सगळे नकली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
एका पक्षाचे दोन तुकडे कारायचे आणि आपण त्याला नकली म्हणायचं, आता जनतेलाच ठरवू द्या कोण असली आणि कोन नकली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ते पुढे म्हणाले, आमचा पक्ष फूटला पण शरद पवारसाहेब यांनी विचारसरणी बदलली नाही. शरद पवार ओरिजनल आहेत. शरद पवार योग्य तेच बोलले. बारामतीत सुप्रिया सुळे विजयी होतील. शरद पवार यांना एनडीएत आणण्यासाठी प्रफुल्ल पटेल, भुजबळ संगळ्यांनीच प्रयत्न केले पण ते तयार असते तर गेले असते, पण शरद पवार कधीच तयार नव्हते हेच सत्य असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha : शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला वंचित कडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर
Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट