मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) वार वाहू लागलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुकीचे वेध लागले असून, प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीकडून महाराष्ट्रातील एकाही लोकसभेच्या उमेदवाराची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंना जोरदार टोला लगावला आहे.
काय म्हणाले अनिल परब?
‘भाजप अनेक जागांवर अग्रही असल्याचं दिसून येत आहे, बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकत असतो. शिंदे म्हणाले बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नाही. एकनाथ शिंदे यांनी तेव्हा म्हटलं होत की मी माझ्या माणसांणा पुन्हा निवडून आणेल. जर एकही नेत्याचा पराभव झाला तर मी राजीनामा देईल. आता राजीनामा सोडा आधी त्या निवडून आलेल्या खासदारांना उमेदवारी तर द्या, नाहीतर राजीनामा ते देणार आहेत का हे त्यांना विचारा’ असा टोला परब यांनी शिंदे यांना लगावला आहे.
ठाण्याच्या जागेवर चर्चा होऊ शकत नाही. दिघे यांनी बाळासाहेबांना गळ घालून ही जागा शिवसेनेकडे आणली होती, अजून ती जागा आपल्याकडे आहे. जर ठाण्याच्या जागेवर बार्गेनिंग होत असेल तर आनंद दिघेंचा फोटो त्यांना यापुढे काढावा लागेल असेदेखील अनिल परब म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू
Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..
Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार
Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर