बेळगाव : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार (Karnataka Congress) पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार पक्षांतर्गत मतभेदामुळे पडेल,असा दावा विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे.
रविवारी बेळगाव येथील गांधी भवनमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून ते बोलत होते. सिद्धरामय्या काहीही झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. तर दुसरीकडे डी. के.शिवकुमार शांत बसणार नाहीत.त्यामुळे त्यांच्यात मतभेद होतील आणि सरकार कोसळेल.गॅरंटी योजनेमुळे कर्नाटकामध्ये अराजकता सुरू आहे.
Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या
गॅरंटी योजनांची हमी देणे कोणालाही शक्य नाही. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी त्यांना गॅरंटी योजना राबविता येणार नाहीत. या स्वरुपाच्या घोषणा बसवराज बोम्मई सरकारलाही जाहीर करता आल्या असत्या. परंतु , ज्या गोष्टींची कार्यवाही करणंच शक्य नाही, त्याची घोषणा न करणे योग्य आहे, असे यत्नाळ यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही राज्यातील 28 पैकी 28 जागा या जिंकून देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सुत्रे पुन्हा द्यावे, आपण सर्वांनी मिळून आजपासून काम सुरु करून पक्षाला परत सत्तेत आणावे, असे आवाहन आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले.