मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्डाव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
‘ही’ 12 ओळखपत्र धरणार ग्राह्य
मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये
पारपत्र (पासपोर्ट),
वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,
बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,
पॅन कार्ड,
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड,
मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,
निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,
आधार कार्ड,
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र,
कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : नाना पटोलेंनंतर आता ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
Accident Video : 4 सेकंद अन् 5 जणांचा खेळ खल्लास; भीषण अपघाताचा Video आला समोर
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका
Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील
Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?
Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का