नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी 12 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर आपण काँग्रेसची साथ का सोडली? यावर पहिल्यांदाच सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. अचानक निर्णय घेतला नाही, लोक मला घालवायला बसले होते असं नाही. पण गेले वर्ष दोन वर्ष लोकसभेसाठी जी तयारी असायला हवी होती ती मला दुर्देवानं राज्यात दिसली नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, इंडिया आघाडीमध्ये काय चालले आहे, तुम्ही पाहात आहात. पक्षात काही घडत नव्हत, पक्षाच्या भविष्यावर आमचे भविष्य अवलंबून आहे. मी पक्षासाठी कमी केले आहे का? मी महाराष्ट्रात 82 जागा निवडून आणल्या होत्या, मुख्यमंत्री असताना. 16-17 खासदार निवडून आणले होते. जेंव्हा पक्षाने संधी दिली तेंव्हा मी तसे आऊटपूटही दिले आहे.
बैठकीतून शिबीरातून काहीही साध्य होत नसते, तुम्हाला लोकांशी संपर्क करावा लागतो. वेळोवेळी सांगून सुद्धा काही बदल झालेले मला दिसले नाही. म्हणून मग सांगून उपयोग होत नसल्याने सांगणे सोडून दिले. भाजपला मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस वाटलो असेल, म्हणून त्यांनी आल्याबरोबर मला राज्यसभेत संधी दिली असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.