मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्यासाठी एक जूनला मतदान होणार आहे. तर चार जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीला जागावाटप करताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून जोरदार हल्लाबोल केला आहे.
श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे,
मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं???
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.… pic.twitter.com/URRnsPQAhe— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) May 28, 2024
काय म्हणाले निलेश राणे?
‘श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू