पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना शरद पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली होती. पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांच्या पाठिंबा होता. पण 4 दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठींबा काढला, असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली. आपण टाकलेल्या राजकीय गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली , असं शरद पवार म्हणाले.
Devendra Fadanvis: शरद पवारांनी ‘त्या’ शपथविधी आधीच भूमिका बदलली; फडणवीसांची टीका
भाजपला 2014 आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.त्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते. तो काळ वेगळा होता पण नंतरच्या काळात त्यांनी जे सांगितलं की, ते भेटले ,.त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा झाली ही गोष्टही खरीय. त्यांनी स्वत: सांगितलंय की, मी पाठींबा दिला होता. पण मी दोन दिवसांनी निर्णय बदलला. जर दोन दिवसांत निर्णय बदलला हे माहिती होते.तर फडणवीसांनी दोन दिवसांनी अशी चोरुन पहाटे शपथ का घेतली ? असा सवाल शरद पवार यांनी केला.
“आमचा त्यांना पाठींबा होता तर दोन दिवसात त्यांची सत्ता कशी गेली. त्यांना राजीनामा का द्यावा लागला ? याचा अर्थ स्पष्ट आहे. सत्तेसाठी भाजपा कुठेही जाऊ शकतो, हे एकदा समाजासमोर यायला पाहिजे होत. या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे सत्तेसाठी काहीही करु शकतात, कुठेही जाऊ शकतात, हे सगळं समजून घेण्याची वेळ आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.
Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू
“हा राजकीय डाव होता का? ते मला माहिती नाही. पण माझे एक सासरे देशातले उत्तम गुगली बॉलर होते. गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या बॅट्समनच्या विकेट घेतल्या होत्या. मी “आयसीसी” चा अध्यक्ष होतो. मी जरी खेळलो नसलो तरी मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? माहिती होतं. त्यामुळे फडणवीसांची विकेट गेली. मला अधिक काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.