जालना : जालन्यातील लाठीमाराच्या (Jalna Lathi Charge) घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. याचे पडसाद आज मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पडले. या लाठीमारावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर सरकारची बाजू मांडली आहे.
![Government](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2023/09/Government.jpg)