मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. पहाटेच्या या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली होती. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा विधान केला आहे. या शपथविधी घेण्याच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं होता ? याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शपथविधीच्या आधी शरद पवार यांच्यासोबतच्या बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचं नियोजन झालं होता. शरद पवार यांच्या सहमतीने मला आणि अजित पवार यांना सरकार बनवण्याचे अधिकार देण्यात आले होते. पण शरद पवार यांनी त्याआधीच आपली भूमिका बदलली, त्यामुळे आमच्याकडे बहुमत नसल्याने आमचे सरकार 72 तासात कोसळले असं फडणवीस म्हणालेत.
Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव
फडणवीसांचा प्रयोग फसला – संजय राऊत
शपथविधी आधी काय झालं हे महत्वाचं नाही, तर तुमचा प्रयोग फसला आहे. त्यांचं हे सरकारही औटघटकेच आहे. त्यामुळे हे सरकार पडेल म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) झोपेतही बडबडत असतील अशी टीका संजय राऊत यांनी केली.