मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Maharashtra Politics) निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणूका पार पडणार आहेत. विधान परिषदेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली आहे. या निवडणुकीसाठी भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, मनसे यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
कशी पार पडणार विधान परिषदेची निवडणूक?
विधान परिषदांच्या निवडणुकीसाठी 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी 10 जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
‘या’ आमदारांचा कार्यकाळ संपणार
विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
निरंजन वसंत डावखरे – कोकण पदवीधर (भाजप)
किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक (ठाकरे गट)
कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक (लोकभारती)
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव
Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात