नवी दिल्ली : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना निवडणूक आयोगाकडून (Code Of Conduct) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत.
मात्र, निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांची दखल घेतली असून निवडणूक आयोगाकडून भाजपा आणि काँग्रेसला नोटीस पाठवली आहे. दोन्ही पक्षांना 29 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित आचार संहितेचे उल्लंघन झाल्याची दखल घेतली आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्षा कडून धर्म, जाती, समुदाय, भाषा या आधारावर द्वेष आणि विभाजन निर्माण केल्याचा आरोप असल्यामुळे हि नोटीस पाठवण्यात आली आहे.
राजकीय पक्षांकडून आपले उमेदवार, स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल आणि उच्च पदावरील व्यक्तींच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात असे निवडणूक आयोग म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा
Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक
Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी
Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट
Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी
Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार