नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे की अजित पवारांचा आहे, याचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये शरद पवार गटाने अजित पवार गटाविरुद्ध मोठा दावा केला आहे.
काय केला दावा?
शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांनी सादर केलेल्या प्रमाणापत्राबद्दल मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्या गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक सदस्यां मृत्यू झाला असल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जवळपास ट्रक भरून शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहे. जवळपास साडेसहा लाख शपथपत्र दाखल करण्यात आले असून त्यामध्ये खासदार आमदार डेलिगेट्स आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश आहे.
पण, अजित पवार यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांमध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झालेला आहे. यासंदर्भातले पुरावे डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवादादरम्यान सादर केले. ज्या पद्धतीने शिवसेनेचे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा आधार केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला नाही असे निदर्शनात येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याच प्रकारची वर्तवणूक देऊ नये, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला अभिषेक मनू सिंघवी यांच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.