कोल्हापूर : छगन भुजबळ यांनी जालना येथील सभेत केलेल्या वक्तव्यांवर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी जोरदार टीका केली आहे. भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोपदेखील छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 17, 2023
राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का ? असा खडा सवाल देखील संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय
Pune Drug Case : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक