महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हनुमान चालीसा चा मुद्दा लावून धरल्यानंतर मातोश्री समोर मान चालीसा करणारच असा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली होती त्यांची बारा दिवसानंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
या सगळ्या घटनांनंतर नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
त्यानंतर आता राहणार दांपत्य दिल्लीवारी करणार असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.
या भेटीमध्ये राणा दांपत्य मुंबई पोलिसांची तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली असून राणा दाम्पत्याच्या उद्याच्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.