बीड : काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या हिंसक वळणाचा सर्वाधिक फटका बीड (Beed News) जिल्ह्याला बसला आहे. यामध्ये आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या घरावर दगडफेक तसेच जाळपोळ केली. त्यांनी सरकार मालमत्तेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या सगळ्या प्रकाराबाबत आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठा खुलासा केला आहे.
काय केला खुलासा?
मराठा आरक्षण आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागल्यानंतर माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आणि वाहनांवर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी पोलीस फोर्स कमी असल्याने हल्ल्याच्या घटना रोखता आल्या नाहीत असा खुलासा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला आहे.
बीडमध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या प्रकरणी आतापर्यंत 278 जणांना अटक करण्यात आली असून, हल्ले करणाऱ्या सहा टोळ्या पोलिसांनी निष्पन्न केल्या आहेत. या टोळ्यांशी संबंध असलेल्या काही व्यक्तींना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेबाबत आणखी तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी
Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस
Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा