पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूका (BJP) नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. मात्र अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी भाजपच्या काही खासदारांनी आपला राजीनामा दिला. त्यांनी नेमका राजीनामा का दिला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. एकूण 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे.
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंर भारतीय जनता पार्टीने बुधवारी मोठं पाऊल उचललं. या निवडणुकींमध्ये जे खासदार आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपाने 4 राज्यांमध्ये सध्या खासदार असलेल्या 21 खासादारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 7-7 खासदारांनी निवडणूक लढवली. छत्तीसगडमध्ये 4 आणि तेलंगणमध्ये एकूण 3 खासदारांना तिकीट देण्यात आलं होतं. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन भाजपाच्या या खासदारांनी आपले राजीनामे सादर केले.
कोणकोणत्या खासदारांनी दिला राजीनामा?
राज्यवर्धन सिंह राठोड – राजस्थान
दीया कुमारी – राजस्थान
किरोडी लाल मीना (राज्यसभा सदस्य) – राजस्थान
नरेंद्र तोमर – मध्यप्रदेश
प्रह्लाद पटेल -मध्यप्रदेश
राकेश सिंह – मध्यप्रदेश
रीति पाठक – मध्यप्रदेश
उदय प्रताप सिंह – मध्यप्रदेश
गोमती साह – छत्तीसगड
अरुण साहू – छत्तीसगड
राजीनामा दिलेल्या खासदारांपैकी प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर हे केंद्रीय मंत्री आहेत. छत्तीसगढमधून खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनीही राजीनामा दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द
Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर
Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस
Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या
Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या