अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशासह राज्यातील प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सध्याची स्थिती पाहाता, महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. यादरम्यान दरम्यान कर्जतमध्ये सुरू असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या शिबीरात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत मोठे विधान केले.
काय म्हणाले अजित पवार?
मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ताकतीनं कामाला लागा अशा सूचना अजित पवार यांनी या शिबीरातून आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जागा वाटपाबाबत लकरच चर्चा हेईल. सातारा, शिरूर, रायगड, बारामती या जागा आपण लढवू बाकीच्या जागांबाबत एकनाथ शिंदे, फडणवीसांसोबत चर्चा होईल’ असे अजित पवार म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू
World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?