Dhananjay Munde

Dhananjay Munde : …तर मी राजकारण सोडून देणार; मराठा आरक्षणाबाबत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

602 0

बीड : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. यादरम्यान आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभरात सभा सुरू आहेत. मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले धनंजय मुंडे ?
आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं. ही सरकारची जबाबदारी आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते परळी मतदारसंघातील सिरसाळा येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जात हा माझ्या राजकारणाचा विषय राहणार नाही, ज्या दिवशी मी जात काढेल त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेल असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

तसेच कोणत्या जातीत जन्माला यावं हे ईश्वराच्या हातात आहे. त्याच्याकडे अर्ज करता येत नाही, हे मला या जातीत पाठवा म्हणून. 1998 पासून धनजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला आहे. बीड जिल्हा परिषदेत पहिल्यांदा 2007 मध्ये मराठा आरक्षणाचा ठराव घेतला. विधिमंडळाच्या सभागृहात सर्वात जास्त मराठा आरक्षणाची भाषण मी केली आहेत. मुस्लिम बांधवासाठी, धनगर समाजासाठी अन् मराठा समजासाठी आरक्षण मिळावे ही माझी भूमिका आहे. याचबरोबर राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची जबाबदारीदेखील राज्याचा कृषीमंत्री म्हणून माझ्यावर आहे.

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी…
Gadchiroli News Murder

Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या

Posted by - May 5, 2024 0
परभणी : महाराष्ट्रातील परभणीमधून (Parbhani Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा…
sunil-tatkare

Sunil Tatkare : ‘माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा’, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

Posted by - June 14, 2024 0
रायगड : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आलेली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…

सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का ? सीमावादाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक 

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *